कोणाच्या जाण्यामुळे मनसे संपणार नाही : अमित इब्रामपूरकर

आम्ही कट्टर राज ठाकरे समर्थक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 18, 2024 10:05 AM
views 104  views

मालवण : मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला काही फरक पडणार नाही. उलट जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले केलेले राजीनामा सत्र ही चांगली बाब असुन हे कार्यकर्ते मनसे पक्षाशी प्रामाणिक कधीच नव्हते. त्यामुळे कधीच पक्षाशी एकनिष्ठ नसलेले कार्यकर्ते राजीनामा देणार असतील तर आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करणार असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.