आंबोली रस्ता ? की मृत्यूचा सापळा ?

सा.बा.च्या इंजिनियर्सवरती फौजदारी गुन्हे दाखल करा : बबन साळगावकर
Edited by: विनायक गावस
Published on: November 24, 2023 12:47 PM
views 670  views

सावंतवाडी : आंबोली रस्ता आहे का..? मृत्यूचा सापळा ? या रस्त्याची जबाबदारी कुणाची ?  हा आमच्या मनाला पडलेला प्रश्न आहे अशी संतप्त भावना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली आहे. आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचे माहेरघर म्हणून प्रत्येक राजकीय पुढारी म्हणत आलेले आहेत. खर सांगायचं झालं तर आंबोली दक्षिण कोकणातील थंड हवेचे ठिकाण हे इंग्रजांच्या काळापासून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. आज इथल्या पर्यटनाला पूरक रस्ते चांगले नसल्यामुळे फटका बसत आहे‌.

तसेच अनेक वाहनांची तोडमोड एक्सीडेंट होऊन नुकसान होत आहे. बरीच वाहन अपघातग्रस्त होऊन अनेक लोक जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे या भागातील रस्ता संपूर्ण उकडला गेला असून खराब झालेला आहे. याचा फटका स्थानिक आंबोलीवासी व्यापारी हॉटेल व्यवसायिक यांना बसत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखेखाली हा रस्ता झालेला आहे. हा रस्ता करत असताना  इंजिनियर्स यावरती देखरेखीसाठी होते. या इंजिनियर्स वरती रस्त्याची जबाबदारी टाकून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.