सावंतवाडी शहराच्या वैचारिक जडणघडणीत अल्ताफ खान यांचं मोठ योगदान : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

Edited by: विनायक गांवस
Published on: July 21, 2024 13:22 PM
views 429  views

सावंतवाडी : कळसुलकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अल्ताफ खान यांच्या निधनाच वृत्त समजले. ऍड. नकुल पार्सेकर यांच्याकडून खान सरांच्या अकाली दुःखद निधनाची बातमी समजली. बातमी ऐकून फार वाईट वाटलं. जेव्हा जेष्ठ संसदपटू स्व. नाना दंडवते यांच्या विरोधात निवडणूक लढवली व विजयी झालो त्यावेळी त्यांनी मला शुभेच्छा देतानाचे त्यांचे शब्द आजही आठवतात. खरं तर ते नाना दंडवतेंच्या प्रचारात हिरीरीने तेव्हा कार्यरत होते. तेव्हा खान सर म्हणाले होते. नाना हरले याच दु:ख आहेच. पण,तळकोकणातील या राजापूर लोकसभा मतदारसंघाला एक वैभवशाली वैचारिक अधिष्ठान असलेली बॅ. नाथ पै, नाना दंडवते यांची परंपरा आहे. ही परंपरा पुढे चालवणारा प्रतिभावंत उमेदवार खासदार झाला याचाही आनंद आहे. त्या काळात निवडणूकीत जय पराजय किती खेळीमेळीने घेतला जात असे याचं हे उदाहरण आहे. 

 सावंतवाडी शहर हे संस्थान कालीन शहर असून या शहराला एक सांस्कृतिक आणि  सामाजिक जडणघडणीचा वारसा लाभलेलं शहर. अल्ताफ खान सर हे अतिशय ज्ञानी होते आणि व्यासंगीही. त्याच्या ज्ञानदानाच्या कक्षा उंतुग होत्या ज्याचा उपयोग सावंतवाडी शहर आणि जिल्हावासियानां झाला. आज आपण एका ज्ञानयोग्याला मुकलो. इश्वर त्यांच्या आत्म्मासं चिरशांती देवो. अशा शब्दांत मा. सुरेश प्रभू यांनी सहवेदना व्यक्त केल्यात.