आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल सर्व अर्ज वैध...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 23, 2023 17:55 PM
views 45  views

मालवण : आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी दाखल ७ तर सदस्य पदासाठी दाखल ३५ उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया सोमवारी पंचायत समिती शिक्षण विभाग येथे करण्यात आली. यात सर्व अर्ज  वैध ठरले आहेत.

दरम्यान, बुधवार 25 ऑक्टोबर दुपारी 3 पर्यत उमेदवार अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदीप महादेव गावडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली.

आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष पुरस्कृत व अपक्ष अश्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर, आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून चिन्ह वाटप केले जाणार आहे. किती उमेदवार रिंगणात हे निश्चित होऊन निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.