जानवली नदीवर 'शरद बंधारा' बाधून अबीद नाईक यांनी जपली सामाजिक बांधिलकी

नागरिकांनी गैरसोय दूर झाल्याबद्दल नाईक यांचे मानले आभार
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 08, 2023 20:01 PM
views 237  views

कणकवली  : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वखर्चातून कणकवली शहरातील जानवली नदी येथील गणपती सानाजवळ 'शरद बंधारा' बांधला आहे.. गेली 15 वर्ष पाणी साठवणुकीसाठी व लोकांना येण्या जाण्या बंधारा बांधून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे..

बंधारा बांधल्यामुळे पाणी साठून राहिल्याने जानवली गावाला व कणकवली शहराला फायदा होतो. जानवलीमधील नळ योजनेची विहिर नदीलगत असल्यामुळे विहिरीची पाण्याची पातळी वाढते व जानवली गावाला पाण्याची टंचाई पाऊस पडेपर्यंत भासत नाही. त्याचबरोबर कणकवली शहरातील विहिरीची पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे शहरातील पाणी तूटवडा भासत नाही. त्याचबरोबर लोकांना जाण्या येण्यासाठी या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. बंधाऱ्यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेतीला मुबलक पाणी मिळते. ह्या सर्व गोष्टीमुळे लोकांची अबिद नाईक यांच्याकड़े बंधारा बांधण्याची मागणी असते व ही मागणी अबिद नाईक दरवर्षी पूर्ण करतात. त्याचबरोबर पक्का ब्रिज कम बंधारा होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत, असे अबिद नाईक यांनी सांगितले.

बंधारा बांधतेवेळी जानवली सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, ग्रामपंचायत सदस्य दामोदर सावंत, रमेश राणे, नितिन राणे, अनुष्का राणे, दिशा राणे, सुवर्णा मेस्त्री, ग्रामस्थ दिपक दळवी, उदय राणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, शहर सरचिटणीस अनीस नाईक, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटनीस गणेश चौगुले, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. अबिद नाईक यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.