वैभववाडी : मांगवली येथे वणव्यात अरुणा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे कोट्यवधी रुपयांचे पाईप जळून खाक झाले.ही घटना आज दुपारी २.३०च्या दरम्यान घडली. या आगीत रवळनाथ मंदिराजीक असलेले पाईप जळून खाक झाले आहेत.यामुळे या परिसरात धुराचे लोट पसरले होते.ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही.