सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शत प्रतिशत भाजपचाच वर्चस्व असल्याचा ठाम दावा माजी आमदार व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. सोमवारी निकाल लागलेल्या 24 पैकी तब्बल 15 ग्रामपंचायतींवर निर्विवादपणे भाजपचे सरपंच निवडून आल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उबाठा सेनेला केवळ पाच ग्रामपंचायतींवर केविलवाण यश मिळवता आलं असल्याचे त्यांनी म्हटले असून उर्वरित बिनविरोध निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीही विकासाचा झंजावात असणाऱ्या भाजपाकडे येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील बिनविरोध झालेली कुडासे खुर्द ग्रामपंचायत वगळता साटेली भेडशी व शिरंगे- बोडण या दोन दोन्ही ग्रामपंचायतींवर निवडून आलेले सरपंच हे भाजपचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण सोमवारी दुपार नंतर येथील स्थानिक पदाधिकारी एकनाथ नाडकर्णी, सुधीर दळवी यांच्या समवेत संबंधित सरपंच व त्यांचे सहकारी यांची भेट घेतली असल्याचेही माहिती त्यांनी दिली आहे.