सावंतवाडी : शहराच्या एसटी बस स्थानकाची वाताहात झाली असून याला जबाबदार कोण ? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. सध्यस्थितीत झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, कॉलेजच्या मुलांना तसेच प्रवाशांना शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास करताना कसरत करत बसावं लागत आहे. एसटी बस स्थानकामध्ये गेली आठ वर्ष ही अवस्था आहे. याची जबाबदारी कोण घेणार ? आहे का त्याला जबाबदार कोण ? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.