वैभववाडी : शहरातील छत्रपती संभाजी चौकात एका महीलेने स्टॉल लावला आहे. सेल्फी पाँइंट नजीक लावलेल्या या स्टॉलमुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय. याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे. शहरात नगरपंचायतीने २२फेब्रुवारी २०२३ ला स्टॉल हटाव मोहीम राबविली होती.शहरात असलेलं अनाधिकृत १००हून अधिक स्टॉल हटविण्यात आले होते.स्टाॅलधारकांनी मोठा विरोध करूनही नगरपंचायतीने ही मोहीम राबविली होती.
यामुळे शहरातील सर्व रस्त्याचे फुटपाथवर मोकळे झाले होते. त्यांनंतर पुन्हा जुन-जुलै महीन्यात शहरात अनाधिकृतपणे स्टॉल लावले जाऊ लागले.आता पुन्हा शहरात ५०हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. आता तर चक्क छत्रपती संभाजी चौकात आज वडापावचा स्टॉल लावला आहे. या ठिकाण तीन व सहा आसनी रिक्षाचा थांबा आहे. तसेच याच ठिकाणी सेल्फी पाॅईंट देखील आहे. त्यामुळे या स्टॉलमुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होणार आहे.नगरपंचायत आता यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.