केसरकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काय केले...?

स्वप्निल लातये यांचा सवाल
Edited by:
Published on: November 11, 2024 14:14 PM
views 117  views

सावंतवाडी : गेले पंधरा वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काय केले ? कोणती सेवा दिली ? असा सवाल स्वराज्य दिव्यांग संघटना अध्यक्ष स्वप्निल लातये यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, आमदार दीपक केसरकर तुम्ही पंधरा वर्षात दिव्यांग बांधवाना काय सेवा दिलात ते जाहीर करावे.आज तुम्ही जे मतामाठी भावनिक राजकारण करता याला दिव्यांग बांधव कधीच बळीपडणार नाही पंधरा वर्षीत  हॉस्पिटल तुम्ही सुधारू शकत नसाल तर तुम्ही मतदार संघाचा विकास काय करणार? मतदार संघात रोजगार आणणार होतात त्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित करत जनता तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार आहे.या निवडनुकीत जनता पंधरा वर्षाचा रोष बाहेर काढणार आहे.तुमच्या घरच्या समोर असलेल बस स्टँडचि अवस्था काय करून ठेवलीत त्यामुळे आता निवडनुकीत जनता तुम्हाला घरी बसवणार आहे हे निश्चित आहे असाही टोला त्यांनी लगावला.