कणकवली : शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण व विश्व हिंदू परिषद च्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त बजरंग दल कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेला कणकवलीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा नेते, आमदार नितेश राणे यांनी शिवशौर्य यात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वागत केले. शिव शौर्य यात्रेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेला रथ या चौकात दाखल झाल्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
बजरंग दलाच्या वतीने कोकण प्रांतात आयोजित केलेली ही शिवशौर्य यात्रा महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची जनतेत जागृती करणारी असून हिंदूंना एकवटण्यासाठी बजरंग दलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार आमदार नितेश राणे यांनी याप्रसंगी काढले. त्यानंतर ही शिवशौर्य यात्रा रत्नागिरी च्या दिशेने मार्गस्थ झाली.
यावेळी बजरंगदल कोकण प्रांत संयोजक संदिप भगत, प्रमुख वक्ते अभयराजे जगताप, शिवाजी स्मारक समिती, रायगड सदस्य अनिरुद्ध भावे, विहिंप कोकण प्रांत सहमंत्री विवेक वैद्य, रत्नागिरी विभाग मंत्री आनंद प्रभू, सिंधुदुर्ग जिल्हा मंत्री प्रसाद ठाकूर, संयोजक बजरंगदल सिंधुदुर्ग यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, सरपंच संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, समीर प्रभूगावकर, संतोष पुजारे, संतोष पुजारे, बजरंग दलाचे अखिल आजगावकर, प्रसाद ठाकुर, दिनेश सरूडकर, परेश सावंत, निकेतन राणे आदि उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.