LIVE UPDATES

विश्राम कुबल यांचा मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन यांच्या हस्ते सन्मान

प्रामाणिक सेवेची मिळाली पोहचपावती : सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव
Edited by:
Published on: January 28, 2025 10:36 AM
views 198  views

दोडामार्ग : मणेरी गावचे सुपुत्र तथा सावंतवाडी दोडामार्ग वनविभागाचे कर्तव्यदक्ष वनकर्मचारी विश्राम कुबल यांच्या वनविभागातील सर्वोत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यात  गेली २५ वर्षाहून अधिक काळ वनविभागात इनामे इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या या प्रामाणिक व्यक्तीचा   यथोचित सन्मान झाल्याने कुबल यांचं सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे. 

७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वन खात्याच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले. वन विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात येतो.  सावंतवाडी वन विभागात दोडामार्ग येथे कार्यरत असलेले विश्राम कुबल यांच्या सर्वोत्कृष्ट प्रशासकीय सेवेची दखल घेऊन यावर्षी त्यांची सावंतवाडी वन विभागातून जिल्ह्याचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, दोडामार्ग वनविभागच्या वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली होती. यावेळी कोल्हापूर विभागीय वन खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

कुबल यांनी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली मानव वन्यजीव संघर्ष प्रकरणी विविध मार्गदर्शनाखाली मानव वन्यजीव संघर्ष प्रकरणी विविध प्रस्ताव, भारतीय वन अधिनियम १९८० अंतर्गत अनेक महत्त्वाची कामे पार पाडली आहेत. विशेषतः २००२ मध्ये हत्ती सर्वप्रथम दोडामार्ग तालुक्यात आल्यापासून कुबल येथील शेतकरी, ग्रामस्थ व वनविभाग यांच्यातील दुवा म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली. तालुक्यात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच सहभाग असलेले कुबल यांचा येथील जनसमुदायशी स्मितभाषी स्वभावाने अनेकांशी आसलेल्या सलोख्याचे संबंध यामुळे वनविभागाला अनेक मोहिमा यशस्वी करताना नेहमीच सहकार्य होत असत. शिवाय पदापेक्षा कर्तव्याला महत्व देणाऱ्या या व्यक्तीने नेहमीच आपलं डिपार्टमेंट आणि सेवेला प्राधान्य दिलं आहे. वरिष्ठाना दिलेली कोणतीही कामागिरी यशस्वीपणे पार पाडत वनखात्याची इतर कामे प्रामाणिकपणे पूर्ण करून जनमानसात वन विभागाची प्रतिमा उंचावण्याचे त्यांनी कार्य केल्याची दखल घेऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या या सन्मानाने तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.