सावंतवाडी : गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी कोणताही विकास केलेला नाही. याची जाणीव सर्वसामान्य जनतेला देखील झालेली आहे. तर महायुतीला सिंधुदुर्ग- रत्नागिरीतून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. कोकणचे भाग्यविधाते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्रातून एक नंबरचे लीड घेऊन लोकसभेत जातील असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, महायुतीला सिंधुदुर्ग- रत्नागिरीतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या रूपानं रत्नागिरी - सिंधुदुर्गमध्ये या वेळी नक्कीच परिवर्तन होणार आहे. कोकणचे भाग्यविधाते केंद्रीय मंत्री नारायण राणे महाराष्ट्रातून एक नंबरचे लीड घेऊन लोकसभेत जातील असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला. तर
गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी कोणताही विकास केला नाही. जनतेलाही याची जाणीव झाली आहे. परंतू, पूर्वीच्या खासदारांवर न बोलता कोकणच्या विकासावर महायुतीचा भर आहे. त्यामुळे विकसित देशासाठी जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करेल व इथला महायुतीचा खासदार नारायण राणेंच्या रूपानं पाठवेल. अडीच ते तीन लाखांच मताधिक्य त्यांना मिळेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच मार्गदर्शन आम्हाला आहे. त्यामुळे ४०० पार करत असताना त्यातील एक खासदार सिंधुदुर्ग- रत्नागिरीतून नारायण राणे असतील व पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपद कोकणाला मिळेल असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला.