देशाची लोकशाही वाचवा : विनायक राऊत

Edited by: भरत केसरकर
Published on: March 27, 2024 10:35 AM
views 102  views

कुडाळ : विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा दावा करत खासदार विनायक राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. कुडाळ येथील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातील युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्यात खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी त्यानी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर जोरदार टीकेची झोड उठवली. देशाची लोकशाही वाचवा असे भावनिक आवाहन विनायक राऊत यांनी केले.

    राऊत म्हणाले, बाबासाहेबांच्या संविधानाचा चुकीचा अर्थ तर राज्यकर्त्यांनी लावला तर त्या वेळेला अधिकारवाने बोलण्याचा अधिकार देशाच्या पंतप्रधानावर नाही देशाच्या राष्ट्रपतींना नाही देशाच्या गृहमंत्र्यांना नाही. ईडीपीडीसीडी तर सोडत त्या संविधानाचा परिपूर्ण अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण घटनापीठाला दिलेला आहे. या देशाच्या सर्वोच्च न्यायाच्या घटना पीठाने माननीय अरविंद केजरीवांच्या राजकारण नेतृत्व करतात दिल्लीचा त्या दिल्लीच्या लोकनियुक्त शासनाची अडचणी करायला सुरुवात केली. त्यावेळेला अरविंद केजरीवाल साहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते की आम्ही लोक नियुक्त शासनाबाबत आम्हाला जे संविधानाने मिळालेले अधिकार आहेत ते बजावण्याचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. अरविंद केजरीवाल्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि पुन्हा एकदा सन्मानाने आयोगाचे देवा आणि त्यांच्या मंत्रिमंडळ खुर्चीवर बसला.  दिल्लीमध्ये लोकशाही खतम करून टाकायची लोकां नीयुक्त मुख्यमंत्र्याला त्याच्या शिपायाचे सुद्धा बदली करायचा अधिकार नाही. हुकूमशाहीचा अभ्यास तरुण वर्गाने करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे.