वेऺगुर्लेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसोबत 'मन की बात'!

पेऺंडुर गावातील शेतकऱ्यांच्या अंगणात केलं नियोजन
Edited by: दीपेश परब
Published on: October 30, 2022 18:43 PM
views 258  views

वेंगुर्ले : प्रत्येक महीन्याच्या शेवटच्या रविवारी असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी याऺचा 'मन की बात' हा कार्यक्रम वेऺगुर्ले तालुक्यात भाजपा पदाधिकारी आपल्या बुथवर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पहातात. परंतु या वेळी हा कार्यक्रम शेतकऱ्यांसोबत पहाण्याचे नियोजन वेऺगुर्ले तालुक्यातील पेऺंडुर गावातील शेतकऱ्यांच्या अंगणात करण्यात आले . 

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच शेती व्यवसाय फायदेशीर बनविण्यासाठी मोदी सरकार सेंद्रिय शेती, शुन्य खर्चाधारीत शेती आणि नैसर्गिक शेती या प्रकाराना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना पशुपालन, मस्त्योत्पादन या सारख्या जोडधंद्यातुन उत्पन्न मिळावे यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतल्याचे सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, ता.उपाध्यक्ष संतोष गावडे, ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, उपसरपंच प्रमोद शिरोडकर, बुथप्रमुख हर्षल परब , दिपक परब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

तसेच यावेळी संभाजी मोहन गावडे, कृष्णा शंकर नाईक, तानाजी बाळू नाईक, रामदास सखाराम नाईक, तन्मय तानाजी नाईक, सुरेश रुमा नाईक, उत्तम वासुदेव नाईक, भार्गव सुरेश नाईक, सचिन संदीप नाईक, विजय रामचंद्र नाईक, सदानंद विठ्ठल गावडे, संदीप ज्ञानेश्वर नाईक, लक्ष्मण लवू गावडे, संतोष शंकर नाईक, नारायण गणपत नाईक, प्रभाकर दशरथ गावडे, गुरुनाथ शिवराम कवठणकर, उत्तम शिवराम कवठणकर, नरेंद्र एकनाथ गावडे, अंकुश रामचंद्र नाईक, दीपक गुरुनाथ कवठणकर, प्रभाकर रुमा नाईक, तुकाराम देवू नाईक, बाळू नारायण नाईक, सीमा दीपक कवठणकर, वैशाली सखाराम नाईक, सुमित्रा सखाराम नाईक, तनुजा तानाजी नाईक, अंकिता अंकुश नाईक इत्यादी महीला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.