कुडाळ : उद्धव ठाकरे यांच्या कालच्या कुडाळ येथील दौऱ्यामध्ये रॅलीमध्ये जो काय उद्धव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर गोंधळ घातला आणि भाजप कार्यकर्त्याना हुसकावण्याचा प्रयत्न करून जो काही प्रकार केला. याला सर्वस्वी आमदार वैभव नाईक हे जबाबदार आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आपण करत असल्याचे प्रसिद्ध पत्रकाद्वारे शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी केले आहे. तर आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व असलेल्या दीपक केसरकर यांच्यावर टीका करण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे कालच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा परिणाम म्हणजे राऊत हे साडेतीन लाख पेक्षा जास्त मताधिक्याने पराभूत होतील आणि वैभव नाईक यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा रुपेश पावसकर यांनी प्रसिद्ध पत्रकाततून केला आहे.