जोपर्यंत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत आमदारकीची पेन्शन घेणार नाही - बाळाराम पाटील यांचे अभिवचन!

पहिल्या पसंतीचे मत देवून विजयी करण्याचे बाळाराम पाटील यांचे आवाहन ; पाटील रायगड जिल्ह्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत
Edited by: भरत केसरकर
Published on: January 27, 2023 12:32 PM
views 243  views


मुंबई : जोपर्यंत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाहीत, तोपर्यंत आपण आमदारकीची पेन्शन घेणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा कोकण शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी केली आहे. शिक्षकविरोधी धोरण राबवणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी शिक्षकांनी आता पुढे यावे आणि उत्स्फूर्तपणे आपल्याला मतदान करावे, आपल्या नावासमोरील नंबर एक लिहून पहिल्या पसंतीचे मत देऊन आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करा, निश्चितच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी गप्प बसणार आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. आताचे सरकार हे शिक्षण व शिक्षक विरोधी सरकार असून हे उलटून टाकायची हीच खरी वेळ आहे, यासाठी मला साथ द्या असे भावनिक आव्हान करत विजयी करण्यातचे आवाहन बाळाराम पाटील यांनी केले आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातील झंझावाती प्रचार दौऱ्याच्या दरम्यान बाळाराम पाटील बोलत होते.


अनेक दिग्गजांची फळी प्रचारासाठी मैदानात -  

  कोकण शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटनेचे शिक्षक सेना व टीडीएफ पुरस्कृत उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांनी कोकण शिक्षक मतदार संघातील पाचही जिल्ह्यात झंझावती परचार दौरा केला.यावेळी त्यांनी शिक्षक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत प्रश्न समजावून घेतले.या प्रचारात त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.त्यांच्या प्रचारात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, जितेंद्र आव्हाड,रायगडचे खासदार सुनिल तटकरे,शिवसेनेचे सुभाष देसाई,शिवसेना खासदार  विनायक राऊत,आमदार  भाई जगताप,समाजवादीचे आमदार रईस शेख,शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील,टिडीएफचे ज्ञानेश्वर कानडे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, संस्था चालक, प्राचार्य मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, सिंधुदुर्गातून अनिल राणे, गजानन नानचे, काका मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे,शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत,खासदार राजन विचारे, मा. खासदार आनंद परांजपे, माजी गृहनिर्माण मंत्री आ.जितेंद्र आव्हाड,आमदार सुनिल भुसारा, मा.आमदार धैर्यशील पाटील,मा.आमदार श्री.मनोहर भोईर,मा.आमदार श्री. दत्तात्रय सावंत सर,मा.आमदार श्री.रुपेश म्हात्रे,ठाणे मनपा माजी विरोधी पक्षनेते श्री.नजीब मुल्ला,नवी मुंबई मनपा माजी महापौर श्री.विठ्ठल मोरे,टी.डी.एफ.संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर कानडे, बहुजन शिक्षक शिक्षकेतर संसदचे अध्यक्ष श्री.अशोक बहिराव सर,शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री.बबन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण जिल्हाध्यक्ष श्री.वंडार पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.मेहबूब शेख,पनवेलचे माजी नगराध्यक्ष श्री.जे.एम.म्हात्रे,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्री.प्रशांत पाटील,काँग्रेस पनवेल मनपा जिल्हाध्यक्ष श्री.आर.सी.घरत,शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष घरत,शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री.नारायण शेठ घरत,नवी मुंबई मनपा नगरसेवक श्री. करण मढवी,तसेच महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात जातीनिशी उतरले आहेत.


आमदार बाळाराम पाटीलांचे जोरदार शक्तिप्रदर्शन - 

    आमदार बाळाराम पाटील यांनी या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबवली आहे. आपण पुन्हा विजयी होईन असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. या मतदारसंघात गेली सहा वर्षे आपण चांगल्या पद्धतीने काम करत शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले त्यामुळे शिक्षक बांधव पुन्हा आपल्या गळ्यात विजयाची माळ घालतील असा दावा बाळाराम पाटील यांनी केला आहे.बाळाराम पाटील हे शेकापचे उमेदवार असून महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. रायगड जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांचा पाठींबा मिळत असून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने प्रचार उतरले असून यामुळेच बाळाराम पाटील यांचे या निवडणुकीत पारडे जड मानले जाते.


रायगड हा शेकाप आणि बाळाराम पाटीलांचा बालेकिल्ला - 

रायगड जिल्हा शेकाप आणी बाळाराम पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो.मागील निवडणुकीत याच बालेकिल्ल्यात मोठी मुसंडी मारत  मागच्यावेळी बाळाराम पाटील यांनी विजय खेचून आणला होता  बाळाराम पाटील यांचा रायगड मध्ये फार मोठा दबदबा आहे.बाळाराम पाटील यांना मानणारा शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात असून सुमारे दहा हजार पेक्षा जास्त मतदान हे रायगड जिल्ह्यात आहे  त्यामुळे बाळाराम पाटील यांची जास्त भिस्त ही रायगड जिल्हावर असणार आहे. याशिवाय ठाणे जिल्ह्यातही करिष्मा करण्याचा प्रयत्न बाळाराम पाटील हे करणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा रायगड हा बालेकिल्ला मानला जातो.याच ठिकाणी मोठं मताधिक्य घेऊन विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचे प्रयत्न बाळाराम पाटलांचे असणार आहेत  त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा बाळाराम पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत.शेकापाने फार मोठी ताकद रायगडमध्ये लावली असून प्रत्येक कार्यकर्ता बाळाराम पाटील यांच्या विजयासाठी झटताना पाहायला मिळत आहे.