सावंतवाडी : सावंतवाडीतील जाहीर सभेत उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेना कुणाची विचारणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही गर्दी आहे. इथल्या आमदारांना सर्वकाही देऊन त्यांनी गद्दारी केली आहे. त्याचा वचपा आपण विधानसभेत काढू असा इशारा उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला.
तर तुमच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच काय झालं ? असा सवाल वैभव नाईक यांनी नाव न घेता दीपक केसरकर यांना केला.तर विकास करू न शकल्यान भाजपला जाहीराती कराव्या लागत आहेत. कॉग्रेसच्या योजना आपल्याच असल्याचं भाजप सांगत आहेत. जनतेच्या तीन लिस्ट करुन मतांसाठी पैसे वाटले जात आहेत असा आरोप आ. नाईक यांनी केला. आदित्य ठाकरे, खा. विनायक राऊत सर्वसामान्यांसाठी, महाराष्ट्रासाठी लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी जनतेन राहील पाहिजे. जगातील सगळ्यात श्रीमंत पक्षाविरुद्ध आमची लढाई आहे. त्यामुळे जनतेन आम्हाला साथ द्यावी. कारण, येथील आमदार जरी विकले गेले तरी जनता विकली जाणार नाही. सत्याच्या बाजून इथली जनता राहील. दोन विरोधक आपल्याला मुर्ख बनविण्यासाठी एकत्र येत आहेत. व्हॅनिटि घेऊन फिरत आहेत असा हल्लाबोल वैभव नाईक यांनी केला.याप्रसंगी इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अतुल रावराणे, कॉग्रेस नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला नेत्या कमलताई परूळेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सहसंपर्कप्रमुख शैलेश परब, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, बाळा गावडे, मायकल डिसोझा आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.