सावंतवाडी: आरोंदा जाधववाडी येथील मुख्य रस्त्याच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या दयनीय अवस्थेबाबत या वाडीतील ग्रामस्थांनी सावंतवाडी पंचायत समीतीचे गटवीकास अधीकारी यांचे लक्ष वेधुन याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली . जाधववाडीतील हा मुख्य रस्त्या सुमारे २०वर्षा पुर्वीचा रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधीत सर्व प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न केल्यामुळेच सध्या या ठिकाणी खड्यांचे साम्राज्य वाढले आहे. याबाबत जावधवाडी ग्रामस्थांमधुन नाराजी व्यक्त होत आहे .तसेच निवडणुकीच्या दरम्यान या रस्त्याच्या नुतनी करणाबाबत फक्त आश्वासने दिली जातात मात्र, निवडणुकीनंतर या कडे दुर्लक्ष होतो .याबाबत स्थानिक प्रशासनाचे ही लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, पुर्ण दिशाभूल करत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधीकारी यांची भेट घेऊन व्यथा मांडली. यावेळी नाईक यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याावेळी शिवाजी जाधव नारायण आरोंदेकर शंकर जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.