कणकवली : अतिवृष्टी व वादळ पावसाने पिसेकामते गावठाण वाडी येथे ज्ञानदेव गुरव व संजय गुरव यांच्या घरावर पहाटे 4 च्या सुमारास वादळी पावसामुळे नारळाचे झाड व पोल कोसळून मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी घर आणि गोठा यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरती माडाचे झाड न पडता विरुद्ध दिशेला पडल्याने ज्ञानदेव गुरव सुदैवाने बचावले आहेत.