वैभववाडी : शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला आज ( ता. १९ ) सुरूवात झाली. गुरेढोरांसह सर्व पाळीव प्राणी घेवुन गावकऱ्यांनी गाव सोडले आहे. पुढील चार पाच दिवस गावकऱ्यांचा मुक्काम सडुरे गावपत्थर येथील राहुट्यांमध्ये असणार आहे. संपुर्ण गाव एकत्र आल्यामुळे एकच गलगलाट सुरू झाला आहे.
सध्या कडाक्याची थंडीत देखील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर गावपळण वार्षीकाचा उत्साह दिसुन येत आहे.गावपळणीमुळे संपूर्ण गाव सुनासुना झाला आहे.गावच्या वेशीबाहेर गावकऱ्यांनी आपला संसार थाटला आहे.पुढील काही दिवस हे गावकरी याच ठिकाणी वास्तव्यास असणार आहेत.