मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य सरकारने त्यांची पहिली मागणी पूर्ण केली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचा जीआर सरकारने मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ही मागणी आता पूर्ण करण्यात आली आहे. याबाबतचा जीआर सुपूर्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी मनोज जरांगे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.