सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याच्या दृष्टीने भाजप, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभागवार मतदारांशी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर या दोन्ही नेत्यांमुळेच शहराचा विकासात्मक कायापालट झाला आहे.
यापुढे हे शहर जगाच्या नकाशावर झळकणार आहे . या शहराचा सर्वांगीण विकास हेच दोन्ही नेते करू शकतात. त्यामुळे विकास कामाला तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरघोस मताधिक्य देऊन केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असं आवाहन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केल. तर या शहरातून जवळपास 90% हून अधिक मतदान महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना प्राप्त करून दिले जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब ,सुधीर आडिवरेकर, ऍड . परिमल नाईक, शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,सुरेंद्र बांदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, गुरुदास कामत, विशाल माने, बंटी पुरोहित, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत ,हेमंत बांदेकर ,सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, विश्वास घाग आदी महायुतीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.