कणकवली : हरकुळ बुद्रुक इथ काणेकर यांच्या दुकानाला अचानक रविवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अखेर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, दुकानातील साहित्य आगीत जळून खाक झाले. या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली.
काणेकर यांच्या दुकानाला ४.१५ वाजण्याच्यासुमारास आग लागली. ही बाब रिक्षा व्यावासियकाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती सरपंच आनंद ठाकूर व शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांना दिली. त्यानंतर लागलीच त्यांनी घटनास्थळी जात ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यासाठी मदत कार्य चालू केले.
तब्बल दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.