
दोडामार्ग : शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शेती, उद्योग, शिक्षण या घटकांना प्रोत्साहन दिले. सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी वस्तीग्रहाची स्थापना केली. सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम केले. त्यांच्या विचाराचे आपण वारसदार आहोत. आजच्या तरुणानी त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करावा. असे प्रतिपादन प्रा दिलीप बर्वे यांनी केले.
दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, शाहू महाराज हे सामाजिक बांधिलकी मानणारे, समाजभान असलेले कर्तबगार राजे होते. त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व ठाऊक होते. म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले होते. मुलांना शिक्षण घेण्यात अडचणी येऊ नये म्हणून सर्व जाती धर्माच्या मुलासाठी वसतीग्रह उभारले होते. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसत त्यांना ते दंड आकारित असे राजे होणे दुर्मिळ असते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष सावंत हे होते. त्यांनीही यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. डी. गाथाडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.संजय खडपकर यांनी मानले.