
सावर्डे : विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती व्यवसाय करावा, एआय तंत्रज्ञानासह शेतीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करुन शेती पुरक व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप द्यावे व सामाजिक बांधिलकी जपून सर्वसामान्य शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रेरित करावे असे प्रतिपादन , चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांनी केले. ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे, सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. त्यानी विविध आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाच्या स्थापनेपासुन आजतागायत झालेल्या शैक्षणिक प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला. शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील 2001 ते 2024 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्याचा पंढरपूर येथे स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या मेळाव्यास २१४ माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालया मार्फत स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्रि ॲग्री ॲल्युमनी असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ातील माजी विद्यार्थ्यांना संघटीत करणे, आजी व माजी विद्यार्थ्यांसोबत ऋणानुबंध कायम ठेवणे व त्यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणे हा प्रमुख उद्देश ठेवुन पंढरपुर मध्ये प्रथमच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच विद्यार्थ्यांच्या सोबत आपुलकीने संवाद साधला. प्राचार्य डाॅ.सुनितकुमार पाटील विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, सुमारे 25 वर्षाच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार होता आले तसेच त्यांच्या सुख दुखात सहभागी होता आले व त्यांचे उज्ज्वल यश ही बघता आले ही भाग्याची गोष्ट आहे असे प्रतिपादन केले. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार शेखर निकम व डाॅ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात सहभागी झालेले विद्यार्थ्यी महाविद्यालयातील आठवणींनी भारावून गेले. पंढरपूर तथा विठुरायाच्या पावनगरीत हा स्नेहमेळावा अगदी पालखीच्या पूर्वार्धात होण्याचा योगायोग नक्कीच पावित्र्यपूर्णता दर्शवत असल्याची सर्वांची भावना होती. कोणताच कुठलाच संबंध नसताना कॉलेजच्या माध्यमातून आपणा सर्वांना आयुष्यभरासाठी एकत्रित बांधणारा धागा आदरणीय शेखर सर आणि प्राचार्य आदरणीय पाटील सर यांनी हृदयापासून जपला व वेळोवेळी अधिक घट्ट केल्या बद्दल सर्व माजी विध्यार्थ्यानी ऋण व्यक्त केले व कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शनानुसार डाॅ. हरिश्चंद्र भागडे, प्रा.प्रसाद साळुंके, श्री.विपुल घाग, प्रा.प्रणय ढेरे व प्रा.रविंद्र सरगर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सावर्डे, (ता.२३): - विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती व्यवसाय करावा, एआय तंत्रज्ञानासह शेतीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करुन शेती पुरक व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप द्यावे व सामाजिक बांधिलकी जपून सर्वसामान्य शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रेरित करावे असे प्रतिपादन , चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांनी केले. ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे, सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. त्यानी
विविध आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाच्या स्थापनेपासुन आजतागायत झालेल्या शैक्षणिक प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला.
शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील 2001 ते 2024 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्याचा पंढरपूर येथे स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या मेळाव्यास २१४ माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालया मार्फत स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्रि ॲग्री ॲल्युमनी असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ातील माजी विद्यार्थ्यांना संघटीत करणे, आजी व माजी विद्यार्थ्यांसोबत ऋणानुबंध कायम ठेवणे व त्यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणे हा प्रमुख उद्देश ठेवुन पंढरपुर मध्ये प्रथमच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच विद्यार्थ्यांच्या सोबत आपुलकीने संवाद साधला. प्राचार्य डाॅ.सुनितकुमार पाटील विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, सुमारे 25 वर्षाच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार होता आले तसेच त्यांच्या सुख दुखात सहभागी होता आले व त्यांचे उज्ज्वल यश ही बघता आले ही भाग्याची गोष्ट आहे असे प्रतिपादन केले. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार आमदार शेखर निकम व डाॅ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात सहभागी झालेले विद्यार्थ्यी महाविद्यालयातील आठवणींनी भारावून गेले. पंढरपूर तथा विठुरायाच्या पावनगरीत हा स्नेहमेळावा अगदी पालखीच्या पूर्वार्धात होण्याचा योगायोग नक्कीच पावित्र्यपूर्णता दर्शवत असल्याची सर्वांची भावना होती.
कोणताच कुठलाच संबंध नसताना कॉलेजच्या माध्यमातून आपणा सर्वांना आयुष्यभरासाठी एकत्रित बांधणारा धागा आदरणीय शेखर सर आणि प्राचार्य आदरणीय पाटील सर यांनी हृदयापासून जपला व वेळोवेळी अधिक घट्ट केल्या बद्दल सर्व माजी विध्यार्थ्यानी ऋण व्यक्त केले व कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शनानुसार डाॅ. हरिश्चंद्र भागडे, प्रा.प्रसाद साळुंके, श्री.विपुल घाग, प्रा.प्रणय ढेरे व प्रा.रविंद्र सरगर यांनी विशेष परिश्रम घेतले.