सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत होत आहे. मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले आहेत. याप्रसंगी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आपल मत व्यक्त केल. सत्तेसाठी गद्दारी करून काही जण उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले. सत्तेसाठी त्यांनी लाचारी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोकणात येत आहेत. संपूर्ण कोकण भगवमय झालं आहे. सर्वसामान्य माणूस हा उद्धव ठाकरेंसोबत आहे. गद्दारांना धडा शिकवण्याच काम हाच सामान्य माणूस करेल असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला. तर मोदी सरकारच्या अच्छे दिनचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. राज्य सरकारला सामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही अशी टीका त्यांनी केली.
तर देशात आता परिवर्तनाची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारला जनता कंटाळली आहे. फक्त टीव्हीवर जाहिराती दाखवल्यापुर्ती हे सरकार आहे. दिशाभूल करण्याच काम ते करत आहेत. इथल्या मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं देखील हवेत विरली आहेत असं मत सतिश सावंत यांनी व्यक्त करत उद्याच्या लोकसभेत खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा निवडून द्या असं आवाहन केलं. कुणीतरी सभा उधळून लावायची भाषा करत आहेत. त्यांनी हे लक्षात घ्यावं की सामान्य जनता पक्षप्रमुखांच्या मागे उभी आहे असं मत व्यक्त केले.
यावेळी आमदार वैभव नाईक, गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, जान्हवी सावंत, सतिश सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, सुशांत नाईक, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.