कणकवली : कणकवली नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांना मागील तीन महिने वेळेवर पगार होत नाही. आज 27 मार्च आला तरी देखील पगार झाला नसल्याने नगरपंचायत बाहेरच काम बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी तत्परतेने मुख्याधिकारी विशाल खत्री यांनी कर्मचारी व त्यांच्यासोबत असलेल्या प्रतिनिधींना घेऊन चर्चा केली व सायंकाळपर्यंत आपला पगार जमा होईल असे आश्वासन दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर कामाला सुरुवात केली होती.
हि बातमी कोकणसाद लाईव्ह चॅनेलला प्रसिद्ध होताच प्रशासनाने याची दखल घेतली व ताबडतोब कारवाई करत सायंकाळी या कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांचे पगार जमा केले.
त्यामुळे मुख्याधिकारी विशाल खत्री यांनी दिलेल्या आश्वासना पूर्ण केल्याने कामगार वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे. तत्परतेने मुख्याधिकारी यांनी आपला प्रश्न सोडवल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी खत्री यांचे आभार मानले.