कणकवली : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर हळवल फाटा येथे अपघात होत असलेल्या वळणावर अपघात रोखण्यासाठी अखेर "रम्बलर" घालण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकातून समाधान होत आहे. कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून या हळवल फाट्यावर अनेक लोकांचे जीव गेले तरीदेखील महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.
त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी राष्ट्रीय महामार्गाकडे येथे रम्बलर लावून हाय मस्त लाईट या रस्त्याच्या कडेला लावण्यात याव्यात अशी मागणी केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणामुळे अपघात होत. वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे त्या ठिकाणी रम्बलर घालण्यात यावे, अशी मागणी नाईक यांनी केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.