आमच्या सरकारने लोकांचा आनंद केला निर्बंधमुक्त !

सिंधुदुर्ग हा कलावंतांचा जिल्हा : रविंद्र चव्हाण
Edited by: विनायक गांवस
Published on: February 07, 2024 06:04 AM
views 166  views

सावंतवाडी : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणार सरकार हे जनसामान्यांच सरकार आहे‌. महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा आहे‌. मागच्या सरकारन लावलेले निर्बंध उठवण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारनं केलं. लोकांना खऱ्या अर्थानं आनंद देण्याच काम आमचं सरकार करत आहे. समाजातील मानसिक तणाव दुर करण्यासाठी हे सरकार कार्यरत आहेत असं प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केल. सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवात ते बोलत होते. 


सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणार सरकार हे जनसामान्यांच सरकार आहे‌. महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा आहे‌. येथील लोक उत्साही आहे. आपली संस्कृती जपताना ते पहायला मिळतात. इथल्या रूढी, परंपरा जपण्याच काम पिढ्यानपिढ्या सुरु आहे. अशा महोत्सवांच्या माध्यमातून या गोष्टींना प्रोत्साहन मिळत.

कोरोनासह मध्यल्या काळात सांस्कृतिक चळवळीवर परिणाम झाला होता. मानसिक तणाक समाजात होता‌. परंतु, नवं सरकार महाराष्ट्रात आलं अन् लोकांच्या मनातील गोष्टी होऊ लागल्या. सर्व सण, उत्सवांवरील निर्बंध उठवले गेले. सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मुर्तींवर निर्बंध टाकण्याच काम मागच्या सरकारन केलं. हे निर्बंध उठवण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारनं केलं. खऱ्या अर्थानं आनंद देण्याच काम आमचं सरकार करत आहे. मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमातून हे कार्य केलं जातं आहे‌. समाजातील मानसिक तणाव दुर करण्यासाठी हे सरकार कार्यरत आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. सांस्कृतिक मेळावा उभं करण्याच काम प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. सिंधुदुर्ग हा कलावंतांचा जिल्हा आहे. दशावतारा सारख्या कला या जिल्ह्यात जपल्या जात आहेत. अयोध्या सारखं नाटक येथील कलाकारांनी बसवलं आहे. त्याला व्यासपीठ देण्यात यावं असं पालकमंत्री म्हणाले.