कोकणातील हे जिल्हे वीज बिल वसुलीत राज्यात अव्वल

Edited by: ब्युरो
Published on: April 13, 2023 19:34 PM
views 119  views

ब्युरो : कोकणासारख्या दुर्गम भागात ग्राहकांना अविरत वीजसेवा पुरविण्याची जबाबदारी नेटाने पार पाडण्याचे कार्य महावितरणचे  कर्मचारी करीत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडळांने वार्षिक वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करुन राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मुख्य अभियंता मा.श्री. परेश भागवत यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप दिली. रत्नागिरीस्थित कोकण परिमंडळ कार्यालयात उत्तम ग्राहकसेवा व महसूल वसूलीच्या उद्दिष्टपुर्तीमुळे गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रारंभी थोर समाजसुधारक महात्मा फुले  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्गचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, रत्नागिरीचे अधिक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा ) कल्पना पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, कार्यकारी अभियंता कैलास लवेकर (चिपळूण), विशाल शिवतारे (खेड), बाळासाहेब मोहिते (कणकवली), अजित अस्वले (चाचणी विभाग), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील, प्रणाली विश्लेषक हर्षद आपटे, व्यवस्थापक (वित्त व लेखा)  रमेश पावसकर यांची उपस्थिती होती. महावितरणच्या कोकण परिमंडळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विभाग, उपविभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन प्रातिनिधीक गौरव करण्यात आला. मुख्य अभियंता भागवत यांचे आढावा बैठकीतील मार्गदर्शन व सातत्यपुर्ण प्रोत्साहन मिळाल्याने उद्दिष्ट साध्य करणे सोपे झाले, अशी भावना अधिक्षक अभियंता  विनोद पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. सर्व अभियंते, जनमित्र, लेखा कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांना यश मिळाले.

रत्नागिरी मंडळाची कामगिरी 

रत्नागिरी मंडळाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 535 कोटी रुपयांची वीज बिलाची वसुली केली. त्यात चिपळुण विभागाने 135 कोटी, रत्नागिरी विभागाने 258 कोटी, खेड विभागाने 141 कोटी रुपये वसूल केले. राजापूर उपविभाग क्र.1 व 2, सावर्डा या उपविभागांनी सर्वोत्तम कामगिरी केली.


सिंधुदुर्ग मंडळाची कामगिरी 

सिंधुदुर्ग मंडळाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 280 कोटी रुपयांची वीज बिलाची वसुली केली. त्यात कणकवली विभागाने 135 कोटी, कुडाळ विभागाने 145 कोटी रुपये वसूल केले. देवगड, वैभववाडी व सावंतवाडी ग्रामीण या उपविभागांनी सर्वोत्तम कामगिरी केली.