LIVE UPDATES

पेरणी झाली...पावसाची प्रतीक्षा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 08, 2025 18:41 PM
views 181  views

देवगड : देवगड तालुक्यामधील  बहुतांश गावांमध्ये सध्या पेरणी केली असून, या भागात सिंचनाची सोय नसल्याने हा भाग पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र, मीरगा पासून खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. परंतु मिरगाचा पाऊस कधी पडणार पावसाने दडी मारल्याने या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

मृग नक्षत्र  ८ जूनला सुरू झाले असून शेतकरी मिरगाचा पाऊस कधी बरसणार, याकडे डोळे लावून बसला आहे. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी हलक्याशा पावसाच्या सरी बरसल्या. मात्र, पुरेसा पाऊस न पडल्याने पेरणी केलेल्या रानात अर्धवट उगवण झाली असून उगवून आलेले भाताचे मोड चिमण्या खाऊ लागल्या आहेत.

देवगड तालुक्यात भात पेरणी झाली असून उर्वरित भुईमूग, नाचणी, सोयाबीन, मका पेरणी करणे बाकी आहे. बळिराजाला आता पावसाची  प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्र मिरग८ जूनला सुरू झाला असून शेतकरी मिरगाचा पाऊस कधी बरसणार, याकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, अजून पावसाची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत.

उन्हाचे चटके सोसत रखरखत्या उन्हात पेरणीयोग्य शेत करत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी  मे मान्यतच रोजी रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त गाठला. या मुहुर्तावर शेतकऱ्यांनी  पेरणीस सुरवात केली. आता पाऊस लांबल्याने भात पेरणी केलेल्या रानात विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी हलक्याशा वळीव पावसाच्या सरी बरसल्या. मात्र, पुरेसा पाऊस न पडल्याने पेरणी केलेल्या रानात अर्धवट उगवण झाली असून उगवून आलेले भाताचे मोड चिमण्या खाऊ लागल्या आहेत. त्यामुळे विहीर, विद्युत पंप, इंजिन याद्वारे पेरणी केलेल्या शेताला पाणी दिले जात आहे.

या वर्षी २०मे पासून उन्हाळ्यामध्येच पावसाने चांगलेच झोडपले परिणामी अनेकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कधी पावसामुळे, तर कधी पावसाअभावी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.पेरणी झाली; मात्र सिंचनाची सोय नाही..देवगड मधील बहुतांश गावांमध्ये   पेरणी केली असून या भागात सिंचनाची सोय नसल्याने हा भाग पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र, मिरगाचा पाऊस कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व पावसाने दडी मारल्याने या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे.