रौप्य महोत्सवी 'देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा रत्नागिरीत

दूरदर्शनचे विजय गांवकर यांना उल्लेखनीय कामाबद्दल पुरस्कार
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 24, 2025 21:26 PM
views 11  views

सिंधुदुर्गनगरी : विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२५ या पुरस्कारांची  घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी हे पुरस्कार रौप्य महोत्सवी वर्षात प्रदान होत असून, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियातील उल्लेखनीय योगदानासाठी निवडक पत्रकार व संस्था यांना गौरविण्यात येणार आहे. या वर्षीच्या या  नारद पत्रकार पुरस्कारांची घोषणा झाली असून,सिंधुदुर्गातील दूरदर्शनचे प्रतिनिधी विजय गांवकर यांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. यावर्षीचा पुरस्कार समारंभ २८ जून २०२५, शनिवार या दिवशी. 'शिर्के विद्यालय रत्नागिरी' आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - एयर मार्शल (सेवानिवृत्त) हेमंत भागवत असून प्रमुख वक्ते म्हणून श्री अभिजीत हरकरे हे मार्गदर्शन 2025 करणार आहेत.

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. निशीथ  भांडारकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार सोहळा भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा व राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला मान्यता देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विश्व संवाद केंद्र, मुंबई यांचा दृढ विश्वास आहे की पत्रकारिता केवळ माहितीचा वाहक नसून, राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे. सत्य आणि तथ्यावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या निर्भीड पत्रकारांना प्रोत्साहन देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे देवर्षी नारद पत्रकार सन्मान आहे. या प्रसंगी, एकूण चार श्रेणींमध्ये पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. या वर्षी खालील पत्रकार व संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेतःवरिष्ठ पत्रकारः श्री अरविन्द श्रीधर कोकजे, रत्नागिरी,उल्लेखनीय कार्य (प्रिंट मीडिया): श्रीराम अनंत पुरोहित, कर्जत,उल्लेखनीय कार्य (इलेक्ट्रॉनिक मीडिया):  विजय साबाजी गावकर, सिंधुदुर्ग आणि उल्लेखनीय कार्य (सोशल मीडिया):  संदेश सोमा फडकले.यांना या वर्षीचे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळ्यात वृत्तपत्र विद्या विषयात विशेष गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहेत.

ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीर जोगळेकर (माजी निवासी संपादक लोकसत्ता) यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिष्ठित ज्युरी सदस्यांसह श्री प्रसाद काथे (संपादक -जय महाराष्ट्र न्यूज चॅनल), श्री विनायक पात्रुडकर (माजी संपादक दैनिक लोकमत), श्रीमती सरिता कौशिक (कार्यकारी संपादक- एबीपी माझा) श्री मिलिंद भागवत (माजी संपादक आयबीएन लोकमत) आणि प्रणव भोंदे (मीडिया सल्लागार) द्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली असून, सर्वांनी  या कर्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती विश्वसंवाद केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.