कुडाळ : जे शिवसेना संपवून कोकण संपवू पाहत आहेत त्यांना या लोकशाही निवडणूकीत जागा दाखवण्याची हीच संधी चालून आली आहे. ही निवडणूक जनतेची आहे. ही निवडणूक भारताचे भवितव्य ठरवणारी आहे. लोकसभेची ही निवडणूक गद्दार विरूद्ध निष्ठावंत अशी असुन निष्ठावंत विनायक राऊत यांना विजयी करा अस आवाहन उबाठा शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी केल. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ माणगाव येथे आयोजित प्रचारसभेत उबाठ शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील बोलत होते.
याप्रसंगी उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संजय पडते, अभय शिरसाट, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे अनैतिक सरकार आहे. ज्या दिवशी येथील मतदाराला आपल्या मताची किमंत समजेल तेव्हा मतदार हा राजा असेल. येथे आता पक्षच चोरला जावू लागला आहे, हे दुर्दैव आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली शिवसेना का फोडली ?याचा विचार झाला पाहिजे.जे-जे वचन शिवसेनेने दिले होते ते-ते वचन शिवसेना आणी उद्धव ठाकरें पुर्ण करत होते हे भाजपला बघवत नव्हत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आपल्या ताब्यात आली पाहिजे या दृष्टीने भाजपने शिवसेना संपवण्याचे षडयंत्र रचले होते असं मत त्यांनी व्यक्त केल.
तर या सरकारने दहा वर्षात काय केल?सरकारने जे केल त्यावर देशातील जनता समाधानी आहे का?ही चिंतेची बाब आहे.हा देश 2036 पर्यंत महासत्ता बनू शकतो.आता फक्त बारा वर्ष शिल्लक आहे.या बारा वर्षांत देशात महासत्ता बनवण्यासाठी भाजपचा पराभव करणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रात रोज दहा ते बारा शेतकरी तर दररोज दोन बेकार आत्महत्या करत आहेत.ही लढाई लोकशाही विरूद्ध हुकुमशाही अशी आहे.यासाठी विनायक राऊत यांना पुन्हा निवडणून द्या असं आवाहन केलं. तर देश कर्जात बुडत चालला आहे.२०५ लाख कोटीचे कर्ज आपल्या डोक्यावर आहे. महाराष्ट्रात बीअरच्या विक्रीत घट झाली यासाठी अभ्यासगट नेमला गेला. पण, मुली शिक्षण प्रवाहात कमी झाल्या तर साधा अभ्यासगट नेमण्याची इच्छा ह्या सरकारला झाली नाही असा हल्लाबोल नितीन बाणगुडे पाटील यांनी जाहीर प्रचार सभेत भाजपवर केला.
दरम्यान, उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे. माणगाव खोऱ्यातील लोक नेहमी शिवसेनेसोबत राहिलेत, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्न विचारणाऱ्यांना माणगावची सभा उत्तर आहे. दहा वर्षांत मोदी काही करू शकले नाही. आम्ही देखील त्यांच्या जाहिरातींना फसलो. विनायक राऊत हे सामान्यातील खासदार आहेत. अनेक विकासकामे त्यांनी या भागात केली. कुणाच्या आमिषाला ते बळी पडले नाही. राणेंना केवळ ठाकरेंवर बोलायला भाजपने ठेवलं आहे. पहिल्या रांगेतील विद्यार्थी १३ व्या यादीत बसवलं आहे अशी टीका उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर केली. तर विनायक राऊत यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं.