नितेश राणेंनी कणकवलीच्या वैद्यकीय अधिक्षकांना धरलं धारेवर

रुग्णसेवेबाबत घेतला उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 30, 2023 16:31 PM
views 95  views

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातुन ओरोसला पेशंट रेफर करायचे नाहीत. पावसाळ्यात लोकांना सेवा द्यावी लागणार आहे. डॉ. धर्माधिका-यांना लातुरला जाताना तळमळ असते , तशी तळमळ इथे सेवा देताना दाखवा . आपल्याला लागणारी मदत आम्ही देवू . पण रुग्णालयाला आलेला पेशेंट बरा होवून गेला पाहिजे. सेवा चांगली द्या , पेशंटला इथुन बाहेर  रेफर करु नका. जिथे प्रॉब्लेम कुठे आहे ,ते मला सांगा. मी खोटी माहिती ऐकायला आलो नाही , तुमची खोटी आकडेवारी नको,  मी समाधानी होणार नाही. मी आरोग्यमंत्र्याकडे जाणार आहे. वैद्यकीय सेवा २४ तास असते , हे डॉक्टरांनी विसरुन चालणार नाही. उपजिल्हा रुग्णालयाची ओळख सरकारी दवाखाना बनवू नका . प्रत्येक रुग्णाला आरोग्याच्या दृष्टीने दर्जेदार सेवा द्यावी. डॉक्टरांनी आपली  मानसिकता बदलावी , रुग्णांना सेवा द्यावीच लागेल , अन्यथा हॉस्पिटल चालवायचे नसेल तर टाळे मारु, असा इशारा भाजपा आ. नितेश राणे यांनी डॉ . नागनाथ धर्माधिकारी यांना दिला आहे.  


कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण सेवेबाबत भाजपा आ. नितेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता आढावा बैठक घेतली.  यावेळी अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी , भाजपा तालुकाध्यक्ष  मिलींद मेस्त्री , कलमठ सरपंच संदीप मेस्त्री , माजी नगरसेवक संजय कामतेकर , भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे व उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉ. महेंद्र आचरेकर, डॉ. रासम , डॉ. आदित्य शेळके, इतर डॉक्टर , आरोग्य कर्मचारी  उपस्थित होते.


    कणकवली उपजिल्हा रुग्णालयात  स्टाफ चांगली सेवा देत नाही , कामापेक्षा सुट्टीवर जास्त असतो . सोनोग्राफी , एक्सरे , रक्ततपासणी वेळेवर होत नाही. रुग्णांना ओरोस , कुडाळ किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये रेफर केल जात. हॉस्पिटल चालवायचे नसेल तर टाळे मारु , तुम्हाला सर्वांना ओरोसला पाठवुयात आणि बाहेर बोर्ड लावू . दर्जदार सेवा मिळत नसेल , तर काय उपयोग ? नवीन तरुण डॉक्टर आले आहेत. त्यांना रुग्णालय प्रमुख म्हणून तुम्ही ही शिकवण देता का ? काही डॉक्टर  घरी जास्त आणि रुग्णालयात कमी असतात. तुमच्या ड्युटीवर सेवा दिली पाहिजे.  या रुग्णालयात इनकमिंग ठेवा आऊट गोईंग बंद आहे. आलेला १० पेशंटमध्ये २ जीवंत जातात , ही ओळख बरोबर नाही . अशा समस्या आ. नितेश राणे यांनी मांडल्या.    


 त्यावर डॉ. धर्माधिकारी यांनी डॉक्टर चांगली सेवा देत आहोत असे म्हटले त्यावेळी आ. राणे यांनी आपले पेशंट ओरोसला का पाठवले जातात ? ते सांगा. त्यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी आयसीयु विभाग बंद स्थितीत आहे. त्यासाठी स्टाफ नाही. डॉ. आचरेकर मॅडम यांनी लहान मुलांचा आयसीयु नाही एक स्त्रीरोगतज्ञ  व भुलतज्ञ हवा आहे असे सांगितले. तसेच रुग्णालयातील कर्मचा-यांनी रक्तपेढी , औषधसाठा व कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचा-यांची मागणी केली.  


  या दरम्यान संजय कामतेकर यांनी तुमचे पेशंट रेफर केले जातात. ओरोस आणि सावंतवाडीला का पाठवता ? अशी विचारणा केली . तसेच आ. राणे यांनी किती तास सेवा देता ? अशी विचारणा केली तेव्हा डॉ. अर्पिता आचरेकर यांनी मुलांचे आजारपण असल्याचे कारण दिले. यावेळी आ. नितेश राणे यांनी संतप्त होत तुमच्या अडचणी काय आहेत ? यावेळी डॉ. आचरेकर यांनी आपण सेवा देत असल्याचे सांगितले. त्यावर आ. राणे यांनी लोकांच्या तक्रारी का होतात ? तुम्हीच तोडगा सांगा तुम्ही आम्हाला पर्याय द्या, रुग्णालयाचे  विश्वासाहर्ता कमी होणार ? तुम्ही जागेवरच नसता का ? हा वैयक्तिक विषय नाही. तुमच्या नैतिकांना नाही का ? जनतेला प्रश्नापेक्षा तुमचे प्रॉब्लेम मोठे आहेत का ? असा सवाल आ. राणे यांनी करत जनता सपर होता कामा नये, असा सल्ला देत मानसिकता बदला , रुग्णांना सेवा द्या , असे कडक शब्दांत सांगितले.


    यावेळी डॉ. धर्माधिकीरी यांनी केवळ सिव्हील सर्जनला सांगितले काय ? तुमचे जबाबदारी संपली का ? अशी विचारणा करत आ. राणे यांनी करत तुम्ही तुमची खुर्ची मोकळी ठेवू शकत नाही . रिकाम्या खुर्च्या भरायला पाहिजे. एनआरएचएम अंतर्गत भरती करा . ऑन कॉल डॉक्टरांना बंद केले. पहिले ऑन कॉल डॉक्टरांची सेवा द्यावी, सिटीस्कॅन सेवा खाजगी रुग्णालयात एनआरएचएम या योजनेअंतर्गत सुरु करा अशी सुचना आ. राणे यांनी केली. यावेळी सर्व डॉक्टरांनी आ. राणें कडे ऑनकॉल डॉक्टरांची सेवा सुरु करा अशी मागणी केली. तेव्हा आ. राणे यांनी तातडीने सिव्हील सर्जनना फोन लावत ऑन कॉल चालू करण्याचा सुचना केल्या.


    तुमच्या लोकांची इच्छाशक्ती नसेल काम करण्याची ? तर त्याचा अर्थ काय ? लोक सांगताहेत सेवा मिळत नाही. तुम्ही काय सांगताहेत कारभार चांगला आहे. तुमच्याशी देने घेने नाही. डॉ . धर्माधिकारी कुठे राहतात ? काय करताहेत ? मात्र लोक फोन करतात, तुम्हाला सेवा द्यायचीच नसेल तर काय उपयोग ? सरकारी रुग्णालय वाटलं पाहिजे , असे तुम्हाला वाटत का ? दम दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दिसत आहात. तुमच्या मानसिकतेला सुधारा , बदला , सुट्टया कमी घ्या. तुम्ही लातुर मध्ये असे काम करणार का ? तुम्ही कोकणात आहात म्हणून असे काम करता अशी विचारना डॉ. धर्माधिकारी यांनी आ. नितेश राणे यांनी केली. त्यावेळी डॉ. धर्माधिकारी निरुत्तर झाले.