राऊतला निष्ठावंत गडकरी, फडणवीस कधीच कळणार नाहीत : नितेश राणे

Edited by:
Published on: September 15, 2024 13:56 PM
views 88  views

कणकवली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देशात आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगळे स्थान आहे.भारतीय जनता पार्टीच्या पक्ष जडणघडणेत सुद्धा त्यांचे मानाचे स्थान आहे. पक्षाचे निष्ठा काय असते हे सन्माननीय नितीन गडकरी यांनी वारंवार दाखवून दिले आहे. माझ्या पक्षाचा प्रधानमंत्री असणे हे माझ्यासाठी परमोच्य आहे अशी भावना त्यांची आहे. राष्ट्र प्रथम हे भाजपच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याची ब्रीदवाक्य आहे. तेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कृतीतून सातत्याने दाखवत आले आहेत. पण ज्यांच्या रक्तातच गद्दारी आणि दलाली आहे त्या संजय राजाराम राऊतला नितीनजी गडकरी देवेंद्रजी फडणवीस अशा भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता कधीच कळणार नाही अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. तू मुख्यमंत्री बनण्यासाठी २०१९ मध्ये प्रयत्न केलेस. आमदारांच्या बैठका घेतल्या मात्र काहीच झाले नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या मागे गोंडा घोळवत फिरू लागला. नितीन गडकरी यांच्यासारख्या निष्ठावान लोकांचे तू नाव घेऊ नको. तुझी ती लायकी नाही.

राऊतने आनंद दिघे साहेबांचे नाव घेऊ नये.त्यांची कुवत सुद्धा नाही.मुंबईतील जुना महापौर बंगला येथे तुझ्या मालकाचा मुलगा, कलाकारांना घेवून पैसा उधळायचा ते तुला मान्य आहे काय ? सर्व धर्मासाठी एकच नियम हवेत, हिंदूंना एक न्याय, मुस्लिमांना वेगळा नियम का? आमचे भुजबळ साहेब यांनी यावर बोलले पाहिजे. राऊत तुझी रक्त तपासणी करावी लागेल.

सुधाकर भडगुजर यांनी सावध रहावे.त्यांना अडकाविण्याच प्रयत्न संजय राऊत चा असू शकतो. जिथे जिथे काँग्रेस सरकार आहे, तिथे हिंदूंना संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. जी स्थिती बांगलादेश मध्ये आहे. तशीच स्थिती भारतात दिसतेय. कर्नाटकात हिंदूंची देवता गणपती बाप्पा ला काँग्रेस पक्षाने पोलीस ना सांगून वॅन मधून घेऊन जात आहेत असे दिसले. त्यामुळे येथील म्हणजे महाराष्ट्रातील हिंदूंनी सावध राहावे. महाराष्ट्रातील जनतेने हे लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.

फडणवीस यांनी ५ वर्षात मराठा आरक्षण दिले, जे शरद पवारांना जमले नाही. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांचे समर्थन करतात आहे. ते आमच्या महायुतीचे नेते आहेत. ते रामदास कदम यांना सांगतील. संजय राऊत ने स्वत: हिंदू धर्म सोडला आहे. यांनी जाऊन अजाण समोर जाऊन नतमस्तक व्हावं. तू आणी तुझ्या मालकाने रक्त हिरव झालं आहे का याची तपासणी करावी. सुधाकर बडगुजर यांचा काटा संजय राऊत काढत नाही ना ? आरक्षण घालवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याबाबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जनतेत जाऊन त्याचा बुरखा फाडु असेही ते म्हणाले.

जो स्वतः मुख्यमंत्री असताना काही करू शकला नाही. शेतकरी हिताचे प्रश्न सोडवू शकला नाही. ज्यांनी असलेले आरक्षण घालवल. त्यांनी जुन्या पेशन बाबत तोंड उघडून बोलू नये. ती जुनी पेन्शन आमचं महायुतीचे सरकार देणार असेही .ते म्हणाले.