विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधावी

परशुराम उपरकर यांचं स्नेहमेळाव्यातून मार्गदर्शन
Edited by:
Published on: June 23, 2025 19:26 PM
views 9  views

मुंबई : शैक्षणिक क्षेत्रा  बरोबरच उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या गुणवत्त  विद्यार्थी, यांच्या  सोबत जेष्ठ नागरिक, तसेच माहेरीवाशीणीना आपण  एकत्रित आणलं आणि आज २६वा   स्नेहमेळावा आयोजित केल्यात यामुळे  आठवणींना खऱ्याअर्थाने उजाळा मिळाला आणि, स्नेह वृद्धिंगत करण्याची चांगली कामगिरी करीता आली. हे निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे असे  माजी आमदार परशुराम उपरकर यांनी   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील राजवाडा मुंबईस्थित मित्र मंडळाच्या स्नेहमेळावा परळ मुंबई भावसार सभागृहात आयोजित करण्यात आला त्यावेळी  अध्यक्षस्थावरुन बोलताना प्रतिपादन केले. यावेळी प्रारंभी इष्ट देवतांचे स्मरण करून मेळाव्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक पुष्पराज कोले , सामाजिक कार्यकर्ते किरण कुबल, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, मंडळाचे अध्यक्ष सचिन कुबल, जेष्ठ नागरिक श्रीधर आरोंदेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. माजी आमदार उपरकर पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती चांगल्याप्रकारे साधली असून यात वेंगुर्लातील विद्यार्थीही मागे नाहीत. हे आजच्या विद्यार्थी  पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने दिसून आले.

अशीच उत्तरोत्तर प्रगतीशील वाटचाल करीत समाजाप्रती ,राज्य आणि देश पातळीवर आपले नावलौकिक वाढवून मोठे व्हा असे विशद केले. उद्योजक पुष्पराज कोले यांनी सांगितले की, समाजातील मुलांनी प्रगती साधत स्नेह वाढवत स्नेह जपायचा हवा !आपण या गावचे विद्यार्थी आहात.मुळात माझे निवासस्थान वेंगुर्ला दाभोसवाडा येथे असून आजच्या समारंभात बक्षीस प्राप्त विद्यार्थीचे कौतुक करणे माझं कर्तव्य समजतो. या मंडळासाठी धडपड करणारे विकास आरोंदेकर यांनी मला गळ घातला. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन करायला या! ज्याच्या नांवातच विकास असा उल्लेख आहे असा माणूस आपल्या गावांसाठी धडपडतो आहे हे पाहून नाही म्हणायची हिंमत झाली. त्यामुळे एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन पाहता आले. सर्व उपस्थितांना शुभेच्छा व्यक्त करून असेच ताकदीने कार्यरत राहून  सुसंवाद साधा असे सूचित केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण कुबल, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. या रंगतदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुराव खडपकर यांनी केले तर आभार हरिष खवणेकर यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने वेंगुर्लावासीय उपस्थित होते.