मुंबई : कोकण रेल्वे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एका सामंजस्य करारवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या अंतर्गत कोकण रेल्वे आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विविध कामात विविध स्तरावर सहकार्य करणार आहे. अत्यंत दुर्गम भागात कठीण स्थितीत बोगदे व मार्ग उभारणीची अनेक कामे कोकण रेल्वेने यापूर्वी यशस्वी केली आहेत. कोकण रेल्वेचा हाच अनुभव लक्षात घेता बोगदा बांधकामात अत्यंत सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या दिशेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या करारांतर्गत, कोकण रेल्वे NHAI प्रकल्पांना सेवा प्रदान करेल, ज्यामध्ये बोगदा बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित डिझाइन, रेखाचित्र आणि सुरक्षा पैलूंचा सर्वसमावेशक आढावा समाविष्ट आहे. KRCL बोगद्यांचे सुरक्षा ऑडिट देखील करेल आणि आवश्यक असल्यास, उपचारात्मक उपाय सुचवेल. या व्यतिरिक्त, KRCL आता NHAI अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
करेल. हा करार दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. यावेळी सामंजस्य करार प्रसंगी कोकण रेल्वेचे संजय गुप्ता, CMD/KRCL आणि संतोष कुमार यादव, अध्यक्ष/NHAI आणि KRCL आणि NHAI मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.