
सावंतवाडी : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी आमची चर्चा झाली. उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार आहोत. निलेश राणे, उदय सामंत यांच्यासह मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार आहे. आमची बैठक तिथे होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली. तसेच महायुतीत झाली नाही तर ते प्रवेश अडवून ठेवणे योग्य नाही असही त्यांनी सांगितले.
सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आम. केसरकर म्हणाले, महायुतीतून सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे उशीर झाला तर निवडणूक लढवण अवघड होत. भाजपचा निर्णय ते घेतील. मात्र, आम्ही मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तसेच चंद्रशेखर बावनकुळे आदींसह उद्या बैठक करून महायुतीबाबत निर्णय घेणार आहे. तिन्ही निवडणूकांबाबत यात चर्चा होणार आहे. सामोपचाराची भुमिका माझी नेहमी असते. त्यामुळे माझा तसा प्रयत्न राहील. भाजपन प्रवेश घेतल्यानंतर त्याला सुरुवात झाली. मात्र, अनेक लोक शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. महायुतीत झाली नाही तर ते प्रवेश अडवून ठेवणे योग्य नाही असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, रोहीत आर्या यांची स्वच्छता मॉनिटर संकल्पना राबविण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. मधल्या काळात मुलांकडून त्यांनी पैसे वसूल केले. ते परत करण्याची पूर्तता न झाल्यानं त्यांचे बील पेडींग राहिलं. ओलीस ठेवण हे चुकीचं आहे. मी त्या खात्याचा आता मंत्री नाही, माझ्याशी चर्चा करून काही झालं नसतं. मात्र, मुलांना ओलीस ठेवण चुकीचं आहे. मुंबईत असतो तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो. यापूर्वी मी त्यांना सहानुभूतीपूर्वक मदत केली होती. चेक न पैसे त्यांना दिलेत, आपली भूमिका सहकार्याची होती. मात्र, डिपार्टमेंटच्या फॉर्म्युला पार पाडण आवश्यक होतं. चुकीचा पायंडा पाडण योग्य नाही अस मत श्री.केसरकर यांनी व्यक्त केल.
दरम्यान, बांदा येथील आत्महत्या प्रकरणी पोलिस व्हिडिओ बघून योग्य ती कार्यवाही करतील असं त्यांनी सांगितलं. तसेच नुकसान भरपाईत सिंधुदुर्गच नाव वगळलेल असताना आम्ही प्रयत्न केले. आठही तालुक्यांना नुकसान भरपाईचा नियम लावण्यास सांगितले. कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांतील पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर ओंकार हत्तीला देखील एका आठवड्यात जेरबंद केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.










