कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यातील निवती किनाऱ्यावरील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणयावरून आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत. 2018 साली महाराष्ट्रातील युती सरकारमधील पर्यटन विभागाने निवतीतील समुद्रकिनारावर पाणबुडी प्रकल्प आणला होता. त्यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर होते. त्यांना सुद्ध ही गोष्ट माहिती आहे. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर बजेटमध्ये या प्रकल्पासाठी 150 ते 200 कोटीची तरतूद केली होती. मात्र, यानंतर या आलेल्या सरकारने हा प्रकल्प दोन वर्षांमध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या भीतीने
हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यास मदत केली. केंद्र सरकारने हा कोकणातील व महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा प्रकल्प गुजरातमध्य नेला व हे मंत्री गप्प बसलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. मात्र, राज्यातील सरकारमधील मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री हे केंद्रातील मोदी सरकारच्या ताटाखालची मांजर झाली आहेत. त्यामुळे आम्ही आता शिवसेना म्हणून गप्प बसणार नाही आहोत. हे त्यांना नजीकच्या काळात दाखवून देवू, या विरोधात जोरदार आंदोलन करू असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.