
मालवण : वायरी - भूतनाथ, चिंदर - आचरा ग्रामपंचायतला कायम स्वरूपी ग्राम अधिकारी मिळावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांना याबाबत निवेदन दिले आहे. मालवण तालुक्यात प्रामुख्याने वायरी भूतनाथ, चिंदर - आचरा या जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायत असून याठिकाणी तसेच मालवण तालुक्यातील इतर ही ग्रामपंचायत मध्ये असलेल्या ग्राम अधिकारी यांजवळ दोन तें तीन ग्रामपंचायत चा कार्यभार दिला आहे
यामुळे आठवड्यातील एक दिवस हे ग्राम अधिकारी उपलब्ध असतात व इतर दिवशी अन्य ग्रामपंचायत ठिकाणी गेलेले असतात त्यामुळे या ग्रामपंचायत मध्ये विविध दाखले, कामांसाठी येणारे नागरिक हतबल होत असतात. वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याविषयी काही नागरिकांनी या ग्रामपंचायत मधील सदस्यां जवळ आपल्या तक्रारी मांडल्यावर या सदस्यांनी श्याम चव्हाण यांसोबत चर्चा करत तेथील प्रश्न मांडले यावर तत्परतेने लक्ष घालतं येत्या काही दिवसात कायम स्वरूपी ग्राम अधिकारी देणार असल्याचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी सांगितले.
नागरी समस्यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वायरी भूतनाथ, चिंदर - आचरा ग्रामपंचायत मधील काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी पदाधिकारी यांनी आज एकत्र येत निवेदन दिले. यावेळी जिल्हा युवक काँग्रेस चे माजी अध्यक्ष तथा वायरी ग्रामपंचायत माजी सरपंच देवानंद मेघश्याम लुडबे, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुका सरचिटणीस तथा चिंदर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत उपसरपंच प्राची माणगावकर, युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पल्लवी तारी - खानोलकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, विठ्ठल तळवडेकर, पराग माणगावकर, दिलीप तळगावकर, बाबू चव्हाण उपस्थित होते.