
वैभववाडी : मालवण सावरवाड येथील विठ्ठल रावजी जंगले (वय-६६)यांचा रेल्वे प्रवासा दरम्यान आज मृत्यू झाला.ते जनशताब्दी एक्सप्रेसने पनवेल ते कणकवली असा प्रवास करीत होते.हा प्रकार आज (ता.२०)दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.
जंगले हे आपल्या कुटुंबासमवेत जनशताब्दी एक्सप्रेसने पनवेल ते कणकवली असा प्रवास करीत होते.सकाळी पनवेल येथे ते गाडीत बसले.त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रूपाली,मुलगा राकेश आणि बिपीन हे होते.दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही गाडी रत्नागिरीला आली.त्यानतंर काही वेळाने श्री.जंगले यांना अस्वस्थ वाटु लागले.त्यामुळे वैभववाडी रेल्वेस्थानकात ही गाडी थांबविण्यात आली.त्यांना तातडीने वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले.शवविच्छेदन केल्यानतंर त्यांचे पार्थीव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.