मळगावात लघु धरणाची मागणी

पालकमंत्र्यांना निवेदन
Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 13:08 PM
views 256  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गनगरी येथे भरवलेल्या जनता दरबारात मळगावचा पाणी प्रश्न घेऊन जलजीवन मिशन कमिटीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन भीषण पाणी टंचाईबाबत चर्चा केली. याबाबत मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, विलास मळगावकर, निलकंठ बुगडे, रुपेश सावंत आदींनी जनता दरबारात ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देऊन मळगाव गावात लघु धरणाची मागणी केली.

पालकमंत्र्यांनी याची दखल घेत जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.यापुर्वी तिलारी धरणाचे पाणी मळगाव मध्ये आणण्यासाठी मळगावातील जलजीवन मिशन कमिटीने स्थानिक आमदार तथा मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यामध्ये पांडुरंग राऊळ, बाप्पा नाटेकर, महेंद्र पेडणेकर, महेश शिरोडकर, सिंद्धेश आजगावकर, निखिल राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांची भेट घेऊन मळगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली होती. मंत्री केसरकरांनी तिलारी चे पाणी मळगावात आणण्यासाठी आठ कोटींची तरतूद करुन लवकरच ही पाईपलाईन टाकण्यात येईल असे सांगितले होते.मळगाव गावात उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.