मालवण : गेल्या १० वर्षात कोणतीही विकासकामे न केलेले तसेच स्वतःचा खासदार निधी खर्च न केलेले अपयशी खासदार म्हणजे विनायक राऊत. त्यामुळे लोकच आता राऊतांच्या विसर्जनाची तयारी खळा बैठकांच्या माध्यमातून करत आहेत. राऊतांच विसर्जन होणार त्या सोबत उबाठाच्या खळा बैठकांमध्ये असलेली कार्यकर्त्यांची उपस्थिति पाहता आमदार वैभव नाईक यांच्याही विसर्जनाची नांदी सुरू झाली आहे. अशी बोचरी टीका भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली.
खोटी आश्वासने, भुलथापा यासोबत जनतेला भडकवायचा एककलमी कार्यक्रम राऊत, नाईक करत आहेत. मात्र आता त्यांचा खेळ संपत आला आहे. लोकसभा निवडणुकीत राऊत यांचे विसर्जन होणार तर विधानसभा निवडणुकीत नाईक यांचे विसर्जन जनताच करणार. हे निश्चित आहे. असे चिंदरकर म्हणाले.
विकसासाठी सिडकोच्या ताब्यात गावे जाणार अश्या अफवा पसरवण्याचे काम राऊत करत आहेत. प्रत्यक्षात असा कोणताही निर्णय झाला नाही. ज्या काही चर्चा होत्या त्याला सरकारने यापूर्वीच पु्णविराम दिला. मात्र राऊत खोट्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत. यालाही जनताच उत्तर देईल. राऊत यांच्या खळा बैठकांना जनता उपस्थित राहात नाही. यावरून त्यांनी समजून जावे. असा सूचक इशारा चिंदरकर यांनी दिला.