सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत होत आहे. मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले आहेत. याप्रसंगी २०१४ ला ज्यांच्यासाठी आम्ही लढलो ते आज खोके घेऊन गेले. मतलबासाठी राजकीय बाप बदलणारे मंत्री हे सावंतवाडीचे आमदार आहेत अशी जहरी टीका महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी केली.
ज्यांच्या विरुद्ध लढा दिला आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. त्यांच्यासाठी तिकीट मागायला आज ते पुढे आहेत. आज केसरकरांचे हात तुपात आहेत. पण, सामन्य जनता आहे तिकडेच आहे. शिवसेनेन तुम्हाला काय दिलं ? तुम्हाला मंत्री कुणी केलं ? उलट्या काळजाचे होऊ नका असा हल्लाबोल त्यांनी केला.
यावेळी आमदार वैभव नाईक, गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, जान्हवी सावंत, सतिश सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, सुशांत नाईक, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.