भारत गुलामीची मानसिकता सोडून पुढे जात आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Edited by:
Published on: December 04, 2023 17:33 PM
views 175  views

मालवण : नौसेना दिनास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तारकर्लीत आगमन झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत भारताचा नौसेना दीन साजरा होत आहे. प्रचंड जनसमुदाय हा दांडी पासून तारकर्ली, देवबागच्या किनाऱ्यावर हा कार्यक्रम पाहण्यासाठी एकवटलेला आहे. नौदलाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. 

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात छत्रपतींच्या कामाचा उल्लेख केला. भारत आता गुलामीची भावना मागे सोडून पुढे जात आहे. भाराताचा इतिहास नेहमी प्रेरणा देणारा असल्याच त्यांनी सांगितलं. भारत निळ्या अर्थव्यवस्थेला गती देत आहे. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज पूर्ण जग भारताच कौतुक करत करत आहे. मेड इंडियाचा बोलबाला होत असल्याच त्यांनी सांगितलं.   

पंतप्रधान ज्या मार्गाने तारकर्लीत दाखल झाले आहेत त्या सागरी महामार्ग, बसस्थानक, भरड तारकर्ली नाका येथून तारकर्ली एमटीडीसी पर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.  या कार्यक्रमाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासह अन्य अतिमहनिय व्यक्ती उपस्थित आहेत.