कुडाळात दमदार पाऊस

भात लावणी अंतिम टप्प्यात
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 16, 2025 16:57 PM
views 80  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या पावसामुळे भात लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

गेल्या २४ तासांपासून तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतात पुरेसे पाणी साचले असून, लावणीसाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची लावणी अजून बाकी होती, त्यांनीही आता युद्धपातळीवर कामे सुरू केली आहेत. लवकरच संपूर्ण तालुक्यात भात लावणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या पावसामुळे केवळ भात लावणीच नाही, तर इतर पिकांनाही नवसंजीवनी मिळाली आहे.