
देवगड : किंजवडे खालचीवाडी ते बाईतबाडी - कदमवाडी जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव गेली १० वर्षे नादुरूस्त आहे. साकव सद्य:स्थितीत पूर्णपणे धोकादायक बनला असून ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन या साकवा वरून ये जा करत आहेत. गावातील शेतकरी पावसाळ्यात आपल्या शेतात जाण्यासाठी व पलीकडील बाईतवाडी-कदमवाडीच्या संपर्कात राहण्यासाठी साकवाचा उपयोग करतात,
श्रमदानातून ग्रामस्थ पारंपरिक बांबू, फोपळीच्या सहाय्याने तात्पुरती डागडुजी करून वर्षानुवर्षे ये-जा करतात. साकवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटा पूल व्हावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.