शेतकऱ्यांच्या पाच बकऱ्या वाघाने मारल्या

Edited by: मनोज पवार
Published on: August 17, 2025 19:35 PM
views 28  views

मंडणगड ( दि. 17):- तालुक्यातील कादवण देऊळवाडीमधील शेतकरी काशीराम सोंडकर याच्या रानातील गोठ्यात 16 ऑगस्ट 2025 रोजी वाघ शिरला व वाड्यातील पाच बकऱ्यांना मारुन टाकल्याची घटना समोर आली आहे यामुळे गावातील लोक घाबरून गेले आहेत. तालुक्यात मुसळधार पाऊस असल्याने त्याचा फायदा वाघाने घेतल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. वनविभागाने पंचनामा करुन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी .