..अखेर 'त्या' व्यक्तव्याबद्दल प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी !

राष्ट्रवादी कॉँग्रेसचा केला निषेध
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 04, 2022 17:35 PM
views 399  views

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितलं. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रसाद लाड यांनी सांगितलं.